When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
What is Agro-tourism
शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांनी दोन दिवस शेतकर्यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्यांनी शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन होय. कृषी पर्यटन हा शहरी पर्यटक आणि ग्रामीण शेतकरी याना आर्थिकदृष्ट्या जोडणारा एक शेतीपूरक व्यवसाय आहे. लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच गावातील शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न , रोजगार मिळवून देण्याचा दृष्टिकोन या उपक्रमामागे आहे. कृषी पर्यटनामुळे ग्रामीण संस्कृती , जीवन आणि वस्तू यांची ओळख शहरी लोकांना होते तर ग्रामीण वस्तूंनाही एक नवीन बाजारपेठ उपलब्ध होते. कृषी पर्यटन संस्कृती , जैवविविधता , पर्यावरण संवर्धनाची मोलाची भूमिका बजावत आहे. कृषी पर्यटन ही नव्याने उदयाला आलेली संकल्पना असून 16 मे हा कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्रात आजमितीला साधारण ७०० ते ७५० कृषी पर्यटन केंद्रे आहेत.
कृषी पर्यटन केंद्रातील नयनरम्य परिसर
कृषी पर्यटनाचा उद्देश (Purpose Of Agro tourism)
‘कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून राज्याचा विकास साधणे’ हे कृषी पर्यटनाचे ब्रीद वाक्य आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध देणे , शेती मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणे , शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाचे , लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडवणे त्यांना शेती विषयी माहिती करून देणे तसेच शेतीत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव देणे , सर्वात महत्वाचे म्हणजे कृषी पर्यटकांना शांत-प्रदूषणमुक्त निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव देणे हा कृषी पर्यटनाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी वापराखाली आणणे, हा देखील कृषी पर्यटनाचा उद्देश आहे.
https://agrotourismvishwa.inagri-tourism-and-challenges-opportunities/
कृषी पर्यटन कोण सुरु करू शकतं ? (Who can start agro-tourism?)
राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि शहरी नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धाेरण राबवण्यास सप्टेंबर २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या , सेंद्रिय शेती करणारा शेतकरी कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात.
कृषी पर्यटन केंद्राचा परिसर
कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना कशी असावी (Concept of Agro-tourism center)
१) कृषी पर्यटन हा शेतीपूरक आणि पर्यावरण पूरक व्यवसाय असावा. साधारण शहरापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात असावा. कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज नसते. एक एकर एवढ्या कमी जागेत निसर्गपूरक कृषी पर्यटन केंद्र उभारले जाऊ शकते. केंद्राच्या ठिकाणी शेती संबंधित अवजारे , ग्रामीण वस्तू पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवाव्यात त्यांना त्याविषयी माहिती करू दयावी.
२) पर्यटकांची राहण्याची व्यवस्था पर्यावरणपूरक खोल्यांमध्ये असावी. गवत , बांबू ,ताटी यांसारख्या वस्तू वापरून झोपडीसारख्या खोल्या बांधाव्यात. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना तंबू किंवा मचाण यांसारख्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी. पर्यटक हे विशेष करून शहरी भागातले असल्याने त्यांना ग्रामीण परिसराची माहिती नसते त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संभाव्य धोके आहेत ते टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
३) पर्यटकांना जेवणासाठी घरगुती पद्धतीचे अस्सल गावरान आणि स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून द्यावेत.
४) पर्यटन केंद्राच्या आवारात किंवा परिसरात निरनिराळी पिके व औषधी वनस्पती यांची लागवड करावी. म्हणजे पर्यटकांना त्या गोष्टींविषयी माहिती देखील होईल आणि शेतातील ताजा भाजीपाला , फळे , औषधी वनस्पती पर्यटक खरेदी करू शकतील.
५) पर्यटकांना हुतूतू , विटीदांडू , लगोरी यांसारख्या ग्रामीण खेळांची माहिती करून देणे व ते खेळ त्यांना खेळायला शिकवणे. याशिवाय पर्यटकांना केंद्राच्या आसपासच्या परिसरातील पर्यटन केंद्रेही दाखवावीत.
६) पर्यटकांना मनोरंजनासाठी लेझीम , जागरण , गोंधळ , वासुदेव, गारुड्याचा खेळ, डोंबाऱ्यांचा खेळ ,आदिवासी नृत्य यांसारख्या ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था करून द्यावी . जेणेकरून या स्थानिक कलाकारांनाही रोजगार मिळेल व ग्रामीण लोककलेचेही संवर्धन होईल. ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन केंद्र म्हणून पाहू लागले आहेत.
कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांचे स्वागत करताना केंद्रचालक
भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र नैसर्गिक संकटे , कमी बाजारभाव यांसारख्या गोष्टींमुळे शेती आर्थिकदृष्ट्या नुकसानीत सापडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता कृषी पर्यटनासारखा शेतीपूरक व्यवसायही विकसित करावा. यामुळे शेतीचे उत्पन्न तर नक्क्कीच वाढेल शिवाय स्थानिक लोकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि यामुळे अपत्यक्षपणे गावच्या विकासालाही हातभार लागेल. तसेच शहरी वातावरणाला कंटाळलेल्या लोकांना क्षणभर विरंगुळाही मिळेल.
When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
Once an agreement is entered into between your Agro tourism project and Agri Tourism Vishwa, there will be no change.
Agro tourism Vishwa respects your privacy and recognizes the need to protect the personally identifiable information (any information by which you can be identified, such as name, address and telephone number) you share with us.
Contact Us 9730023946
agrotourismvishwa@gmail.com
info@agrotourismvishwa.in
Address Agro Tourism Vishwa,
Rachna Avenue, Good Luck Chouk,
Ferguson College Rd,
Shivajinagar, Pune- 411004
Leave a Reply
You must be logged in to post a comment.